जळगाव जिल्ह्यात केळी पॅकिंग साठी
थर्मोकॉल व प्लास्टिकचा वापर
(रावेर विनोद कोळी)
जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळी
उत्पादन घेतले जाते .
केळीमध्ये नवनविन तंत्रज्ञान विकसित झाले असून , घडाला प्लॅस्टिकचे आवरण घालण्यात येते आहे .
तसेच केळीचे घड कापुन आणल्या नंतर त्यांना स्वच्छ केल्यावर वाहातुक वाहानामध्ये
लोड करतांना केळीच्या
आजुबाजुला धक्के लागुनये म्हणून , व प्रवासामध्ये केळीचे नकसान होऊनये यासाठी वाहान आधीच थर्माकॉल च्या बारीक
आवरणाने आच्छादनात येते .
त्यामुळे केळीचे नुकसान होत नाही .
व देशाच्या सर्वाच भागात पाठवली जाते .
मात्र परिणामी हे आवरण लावत असतांना त्याचे अवषेश शेतातच जमिनिवर पडून असतात .
प्लाटिकच्या व . थर्मोकोलच्या अतिवापरामुळे ,
जागोजागी यावल सावदा रावेर पासून तर थेट माहाराष्ट्रच्या हद्दी पर्यंत
रस्त्याच्या दुतर्फा भागाला मुख्यात : विवरे , वाघोदा , रावेर , व इतर गावां जवळ उकिडयांवर थरच्या थर
तुकडे विखुलेले असतात .
वारंवार एकाच थर्माकोल व प्लास्टिकचे तुकडे पडुन
राहील्याने जमिनित
पाणी कसे मुरेल हा प्रश्न
आता निर्माण झाला आहे .
कारण प्लास्टिक कचरा हा नष्ट होत नाहीत . किंवा त्याला रिसायकलला पाठवता येत नाही हे कचऱ्यात
टाकण्यात येत असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे .
रावेर यावल परिसर हा आधिच डार्किझोनमध्ये समाविस्ट करण्यात आला आहे . येथिल भुर्गभातील पाण्याची
पातळी खालावलेली असतांना जमिनिवर हे प्लास्टिक कचरा व थर्मोकॉलचे थर टाकण्यात येत आहेत .
याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होतांना दिसत आहे .
भविष्यातील होणारे वाईट परिणाम थांबण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे व थर्मोकॉल व प्लास्टिकचा वापर योग्य पद्धतीने करून ,
राहीलेला कचरा गोळा करून , नेस्त नाबुता करावा
अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे .

0 Comments